Friday, June 24, 2022

आर्थिक साक्षरता (Financial Literacy ) महत्वाची का आहे ?


 

खासगी सावकारीचा राज्याला पडलेला फास सुटण्याऐवजी आणखी घट्ट होत आहे. विमा प्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या धुळे जिल्ह्यातील सावकाराकडे कोट्यवधींचे घबाड हाती लागले. गरजूंना सरकारी बँकांकडे विश्वासाने यावेसे वाटेल, अशी व्यवस्था आवश्यक आहे.

गरजवंताला अक्कल नसते व लोभीपणाला अंत नसतो. परस्परविरोधी असलेल्या या उक्तींचा प्रत्यय देणाऱ्या व्यक्ती काही कारणाने एकत्र आल्या, तर काय गहजब उडू शकतो, याचे मासलेवाईक उदाहरण म्हणून धुळे येथील राजेंद्र बंब या विमा प्रतिनिधी असलेल्या सावकाराच्या कारवायांकडे पाहता येते. या महाशयांकडील सोने-चांदीच्या दागिन्यांसह वीस कोटी रुपयांची माया पोलिस कारवाईत हाती लागली आहे. गंमत म्हणजे, ही खबर सर्वप्रथम आयकर विभागाला लागली होती; परंतु साध्या विमा प्रतिनिधीकडे असणार तरी किती पैसा, असा विचार केल्याने हे प्रकरण पोलिसांकडे गेले. बंबचा सहायक म्हणून काम करणाऱ्यानेच फसवणुकीची तक्रार नोंदविल्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि त्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांना बेकायदा व्यवहारांचे घबाडच सापडले. कोट्यवधी रुपयांच्या रोख रकमा सुरुवातीलाच हाती आल्यावर पोलिसांनी खोदकाम वाढविले. प्रारंभी एक-दोन दिवसांत कारवाई संपणार, असे वाटत होते. आज दोन आठवडे उलटल्यानंतरही शोधकार्य थांबलेले नाही. पेपर विकता विकता विमा व्यवसायात उतरलेल्या बंबने जी. पी. फायनान्स प्रा. लि. कांदिवली ही कंपनी काढली. त्यातून खासगी सावकारी सुरू केली. अडल्यानडल्यांना कर्ज देताना, रकमेच्या दीड पट एवढा विमा काढायचा व हप्त्यांची रक्कम वजा करून उरलेली रक्कम द्यायची. कर्जदेखील महिन्याला शेकडा दोन ते ३० टक्क्यांपर्यंत व्याजाने दिले जात असे. यातून गरजवंतांची प्रचंड पिळवणूक होत होती. प्रत्येक कर्जदाराच्या विम्यामुळे या क्षेत्रातही दादागिरी वाढली होती. महाराष्ट्रात सर्वाधिक विमे काढणाऱ्या लोकांमध्ये त्याची गणना होत असे. हा प्रकार वर्षानुवर्षे सुखेनैव चालला.

कर्जदार हे विशेषत्वाने गोरगरीब, हातावर पोट भरणारे असत. साहजिकच, अन्यायाविरोधात दाद मागण्याची हिंमत, धाडस त्यांच्यात नसे. या परिस्थितीचा फायदा उठवत, गेली काही वर्षे बंबने अक्षरश: उच्छाद मांडून उखळ पांढरे केले. अनेक बँकांमधील लॉकरमधून रोकड, दागदागिन्यांसह कर्जदारांच्या मुदतठेवीच्या पावत्या, सौदा पावत्या, कोरे धनादेश, मालमत्तेची कागदपत्रे, मुद्रांक, आधारकार्ड, शिधापत्रिका, पॅनकार्ड, फोटो, परकीय चलन व सोन्याची नाणी असे घबाड हाती लागले. कर्जदारांच्या मालमत्ता, राहते घर, शेती गहाण ठेवून, काहींचे मुखत्यारपत्र करून नातेवाइकांच्या नावावर करून ठेवलेलेही आढळले. एकूणच, हे प्रकरण ‘वाढता वाढता वाढे’ या गतीने गंभीर होत आहे. अशा गुन्ह्यांची संख्या राज्यातच नव्हे, तर देशभरात प्रचंड आहे. अर्थसाक्षरतेचा अभाव, हा अशा प्रकरणातील मुख्य घटक असला, तरी संबंधितांना त्या क्षणी केवळ आपली गरज दिसते. अशा गरजूंमुळेच सावकार नावाच्या संधीसाधूंचे फावते. खासगी सावकार या गोरगरिबांच्या जगण्याला लागलेल्या जळवा आहेत. अलीकडे तर राजरोस परवाने काढून, ‘फायनान्स’च्या नावाखाली सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. बड्या कंपन्याही या स्पर्धेत उतरल्या आहेत. कर्जवसुलीचे ठेके देऊन, या आधुनिक सावकारांनी सामान्यांना मेटाकुटीला आणले आहे.

मध्यंतरी या कंपन्यांच्या अशा उद्योगांना न्यायालयाने चाप लावला; परंतु पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू आहे. एकट्या नाशिकमध्ये गेल्या दोन महिन्यांत सावकारांच्या तगाद्याला कंटाळून दोन आत्महत्या झाल्या. काही वर्षांपूर्वी ‘केबीसी’ प्रकरणात २०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाली. त्यात पाच हजारांहून अधिक तक्रारदारांनी राज्यभरातून न्याय मागितला आहे. यामध्ये नाडले गेलेले सर्वाधिक गुंतवणूकदार मराठवाड्यातील होते. नाशिकमधील मिरजकर व आडगावकर सराफ यांच्या चिटफंड प्रकरणात गुंतवणूकदारांची कोट्यवधींची रक्कम गोत्यात आली आहे. आर्थिक गुन्हे विभागाकडे आणखीही अनेक प्रकरणांची यादी आहे. धुळ्याची घटना अतोनात गरजेचा परिपाक, तर नाशिकमधील इतर घोटाळे हे अधिक व्याजाच्या लोभाची उदाहरणे आहेत. लोभ, मग तो कोणताही वाईटच; परंतु सामान्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन, त्यांची आयुष्यभराची पुंजी हातोहात लंपास करणे त्याहून वाईट. हे वर्षानुवर्षे चालू आहे. बंबसारखा सामान्य विक्रेता कोट्यवधींचे विमे धुळ्यासारख्या ग्रामीण भागातून कसे काढतो, याचे आयुर्विमा अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटून चौकशी करावीशी वाटली नाही. फायनान्स कंपनीबाबत एकाही सरकारी बाबूला कधी तपास वा खात्री करावीशी वाटली नाही, हे खरे आजच्या व्यवस्थेचे दुखणे आहे. ‘मला काय त्याचे,’ ही वृत्तीही अशा भामट्यांना पोषक ठरते. हे थांबण्यासाठी सर्वच थरातील लोकांनी सजगता बाळगायला हवी. गरजूंना सावकाराऐवजी सरकारी बँकांकडे विश्वासाने यावेसे वाटेल, अशी व्यवस्था आपण करू शकणार नाही का?


स्रोत : https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/raj-ka-run/economic-offences-wing-raid-rajendra-bamb-dhule/

Friday, June 17, 2022

नो क्लेम बोनस (NCB) क्या होता है? / What is No Claim Bonus?

नो क्लेम बोनस (NCB) क्या होता है?  / What is No Claim Bonus?


क्या आपको यह पता है कि आपके वाहन का बीमा करने वाली कम्पनी आपको अच्छी तरह से ड्राइविंग करने और पॉलिसी वर्ष में कोई दावा नहीं करने के लिए पुरस्कार अथवा बोनस देती है? इस पुरस्कार को ही "नो क्लेम बोनस" या "NCB" कहते है। 

यदि आप लगातार कुछ वर्षों तक कोई बीमा दावा नहीं करते हैं, तो आपको बीमा प्रीमियम में NCB के रूप में छूट मिलती है जो आपको अपनी पॉलिसी को नवीनीकृत करवाने पर प्राप्त हो सकती हैं। पिछली बीमा पॉलिसी अवधि के आधार पर 20% से 50% तक एनसीबी की छूट मिल सकती है। यह छूट 50% से अधिक नहीं मिल सकती है चाहे आप छह साल से से ज्यादा अवधि तक क्लेम नही लिया हो।

 

प्रीमियम में यह छूट आमतौर पर निम्न प्रकार मिलती है।

दूसरे वर्ष के लिए 20%, 

तीसरे वर्ष के लिए 25%, 

चौथे वर्ष के लिए 35%, 

पांचवें वर्ष के लिए 45% 

और छठे वर्ष के लिए 50% है।  

 

50 प्रतिशत से अधिक छूट नहीं मिल सकती: No Claim Bonus, पिछली बीमा पॉलिसी के अवधि के अनुसार, 20 प्रतिशत से 50 प्रतिशत तक हो सकता है। लेकिन, किसी भी कीमत पर यह 50 प्रतिशत से अधिक नहीं हो सकता। भले ही आप 6 या उससे ज्यादा वर्षों तक बिना Claim के गुजार चुके हों। 


क्लेम करते ही बोनस का फायदा खत्म: नई पॉलिसी के दौरान, कभी भी अगर कोई Claim किया जाता है, तो  No Claim Bonus, आगे की पॉलिसी अवधि के लिए खत्म हो जाता है। लेकिन, आगे फिर किसी साल के दौरान आपने claim नहीं किया तो, उसके बाद की अवधि में फिर No Claim Bonus का फायदा ले सकते हैं।


अधिक जानकारी के लिये आप हमे संपर्क कर सकते  हे !

७५०७८-८४४७७/ ०२५३--९७५-९७५


Friday, June 10, 2022

गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

 



गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

गुंतवणूक हा आर्थिक नियोजनाचा महत्वाचा भाग आहे. परंतु, दुर्दैवाने फार कमी लोकांना गुंतवणुकीचे महत्व कळते. आजच्या लेखात आपण गुंतवणुकीची प्रमुख कारणे कोणती आहेत, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 


आपण या लेखात गुंतवणुकीची प्रमुख कारणे पाहणार आहोत. 

१. आपली आर्थिक उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी:

  • आपण ठरवलेली आर्थिक उद्दीष्ट्येच  गुंतवणुकीची प्रेरणा देत असतात. मग ती उद्दिष्टये स्वतःच घर विकत घेण्याचं असो,मुलांच्या उच्च शिक्षणाचं असो,आलिशान गाडी घ्यायचं असो किंवा सेवानिवृत्ती नंतर आरामदायी क्षणांचं असो.
  • आपल्या आर्थिक उद्दिष्टांची यादी करा आणि  ही उद्दिष्टये साध्य करण्यासाठी त्यानुसार आवश्यक जमापुंजी बाळगणे आवश्यक आहे. म्हणूनच गुंतवणूक करताना अल्प-मुदत किंवा दीर्घ-मुदतीचे पर्याय निवडून योग्य परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा प्रारंभ करावा. 

२. कर वाचवण्यासाठी 

  • कर वाचविण्यासाठी १९६१ च्या आयकरकायद्याच्या कलम ८० सी नुसार पगारधारकांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 
  • आपलं करपात्र उत्त्पन्न कमी व्हावे म्हणून वेगवेगळे गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करायला हवा. 
  • वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकता. 

३. दीर्घकाळासाठी आर्थिक संपत्ती तयार करणे:

  • संपत्ती निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी गुंतवणूकीची योजना तयार करणे पूर्णपणे आवश्यक आहे.
  • दीर्घकाळासाठी संपत्ती तयार करण्याच्या हेतूने गुंतवणुकीचा विचार करताना आकर्षक परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी अशा पर्यायांचा विचार करावा.

४. सेवानिवृत्तीची सोय म्हणून:

  • आजची पिढी चांगली म्हणजे पाश्चात्य  जीवनशैलीच्या आहारी जाऊन सगळ्या गोष्टींसाठी खर्च करत असते. 
  • निवृत्तीनंतर निवांत आणि चिंतामुक्त आयुष्य घालवायचे असेल, तर हाताशी पुरेशी गुंतवणूक असायला हवी. 
  • कुठलीही वेळ सांगून येत नसते म्हणून अचानक येणारं आजारपण तसेच इतर काही पारिवारिक बऱ्याचदा ही उंचावलेली जीवनशैली राखण्यासाठी निवृत्तीनंतरच्या नियोजनाचा विसर पडतो. पण जर अडचणींवर मात करण्यासाठी योग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 


५. भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास:

  • व्यवसाय सुरु करायचं म्हटलं की पुरेसं भांडवल असणं आवश्यक आहे. 
  • आर्थिक गुंतवणूक ही व्यवसाय निर्मिती आणि वाढीचा महत्वाचा भाग आहे. 
  • भांडवल निर्मितीच्या उद्देश्याने गुंतवणूक करण्यासाठी जोरदार परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करायला हवा.
  • अनेक मोठे गुंतवणूकदार व्यवसाय वाढीसाठी किंवा नवीन स्टार्टअपसाठी वित्त पुरवठा करतात. ते नवीन व्यावसायिकांना उद्योग स्थापन करण्यासाठी हातभार लावतात. पण असे गुंतवणूकदार शोधणे सोपं नाही, म्हणून वैयक्तिक गुंतवणूक असणे आवश्यक आहे.  
  • व्यवसाय सुरु करणे व वाढविणे ही फारशी सोपी गोष्ट नव्हे म्हणून आपली प्रारंभिक आर्थिक योजना तयार असणे आवश्यक आहे तरच तुम्ही यशस्वी उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करू शकाल.      


 ६. आपली जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी:

  • असं म्हणतात कोणतीही वेळ सांगून येत नसते. अर्थात उद्या काय होईल याचा तर्क आपण कोणीही काढू  शकत नाही. 
  • प्रत्येकाचे आयुष्य अनिश्चित प्रसंगांनी भरलेलं असते. कधी एखादी दुर्दैवी घटना घडू शकते ज्यामुळे तुम्हाला अचानक अनेक आर्थिक संकटाना तोंड देणं भाग पडू शकतं.  
  • अशा आर्थिक बदलांना सामोरे जाण्यासाठी उशाशी थोडा पैसे बाळगून असणं केव्हाही चांगलंच.
  • आपल्या गुंतवणुकीच्या काही भागाची गुंतवणूक आपण कधीही तात्काळ काढू शकतो अशा पर्यायांमध्ये करावी ज्याला ‘तरल गुंतवणुक’ असं म्हणतात. 
  • यामुळे काही भीषण परिस्थितीत नोकरी करणे शक्य नसले तरी या गुंतवणुकीची मदत घेऊन तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवू शकता तसेच रोजची जीवनपद्धती देखील विस्कळीत होणार नाही.

७. वायफळ खर्च कमी करण्यासाठी:

  • तुमच्याकडे किती नवनवीन कपडे किंवा किती लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आहेत यामुळे तुमच्या भविष्यावर फारसा फरक पडत नाही. मात्र तुम्ही किती गुंतवणूक केली आहे याचा संबंध तुमच्या भविष्याशी येतो. म्हणूनच योग्य वयात आपल्या काही वायफळ सवयींवर नियंत्रण ठेऊन अनावश्यक खर्च कमी करायला हवे. 
  • बचत खात्यात पैसे गुंतवणे, स्टॉक मार्केट, बँकेची मुदत ठेव योजना (एफडी), बॉण्ड्स अशा काही पर्यायांचा विचार करून गुंतवणुकीची सुरुवात करायला हवी. यामुळे ठराविक आर्थिक शिस्त राखली जाईल . 
  • गुंतवणूक ही एखाद्या झाडाप्रमाणे आहे, आज ते झाड लावलं, नियमित लक्ष दिलं तरच त्याची फळे उद्या खायला मिळतील. त्याप्रमाणे आज योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा भविष्यात दिसेल. 


८. भविष्याचं आर्थिक नियोजन आणि आर्थिक सुरक्षितता 

  • भविष्याच्या दृष्टीने वित्त व्यवस्थापनाचा विचार करत असाल तर मासिक खर्चाच सुद्धा योग्य नियोजन व आर्थिक शिस्त हवी. गुंतवणुकीची सुरुवात लवकर केल्यास आपली आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी आपण अधिक सक्षम होऊ शकतो. 
  • अतिरिक्त पैसा जवळ असणे हे गुंतवणुकीचे मुख्य धोरण आहे.भविष्यात येणाऱ्या अचानक अडचणी उदाहरणार्थ, घरात कुणाचं एखादं मोठं आजारपण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अशा अनेक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणे आवश्यक आहे. 
  • आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे संतुलन राखणे आवश्यक आहे. 

थोडक्यात,गुंतवणुकीमुळे आपल्या पैश्याची वाढ होण्यास मदत होते,आपली आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करता येतात. तसेच भविष्यातील आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी योग्य जमापुंजी तयार करता येते. त्यामुळे योग्य आर्थिक नियोजन करून गुंतवणुकीस प्रारंभ करा व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याचा आनंद घ्या.  


-- साभार : अर्थसाक्षर

Friday, June 3, 2022

PMJJBY और PMSBY के प्रिमीयम मे बढोती

 


केंद्र सरकार ने साल 2014 में प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना और प्रधानमंत्री  सुरक्षा बीमा योजना की शुरुआत की थी. इस योजना के जरिए सरकार गरीबों और जरूरतमंदों तक बीमा की सुविधा पहुंचाने का काम कर रही है.  1 जून 2022 से आपको इसके लिए ज्यादा पैसे खर्च करने होंगे. 


प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा क्या है? (PMJJBY)  

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना के तहत आपको 2 लाख रुपये का इंश्योरेंस कवर की सुविधा मिलती है. इस योजना का लाभ लेने के लिए आपकी उम्र 18 से 50 साल के बीच होनी चाहिए. इस योजना की प्रीमियम की राशि ऑटो-डेबिट (Auto Debit Mode) के जरिए कट जाती है. आपके अकाउंट में केवाईसी (KYC) की सुविधा होनी चाहिए. 

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना क्या है? (PMSBY)

यह एक साल की दुर्घटना बीमा योजना है. इसका भी साल-दर-साल नवीनीकरण किया जाता है और दुर्घटना के कारण मृत्यु या विकलांगता के लिए कवरेज की पेशकश की जाती है. बैंक या डाकघर में बचत खाता रखने वाले 18-70 वर्ष के आयु वर्ग के व्यक्ति इस योजना के तहत नामांकन के लिए पात्र हैं. दुर्घटना के कारण मृत्यु या विकलांगता के लिए 2 लाख रुपये (आंशिक विकलांगता के मामले में 1 लाख रुपये) दिए जाने का प्रावधान है.

केंद्र सरकार ने दोनों योजनाओं के प्रीमियम में बढ़ोतरी करने का फैसला लिया है. प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) का सालाना प्रीमियम 330 रुपये से बढ़कर अब 436 रुपये हो गया है. इसके अलावा सरकार ने प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) के प्रीमियम को 12 रुपये से बढ़ाकर 20 रुपये करने का फैसला लिया है. बता दें पहले यह प्रीमियम 12 रुपये सालाना था. इसमें 8 रुपये का इजाफा किया गया है. 

31 मार्च तक PMJJBY और PMSBY के तहत सक्रिय ग्राहकों की संख्या क्रमशः 6.4 करोड़ और 22 करोड़ थी. PMSBY योजना में बीमाकर्ताओं द्वारा 1,134 करोड़ रुपये की राशि प्रीमियम और रुपये के दावों के लिए एकत्र की गई हैं. 31 मार्च तक सुरक्षा बीमा योजना के तहत 2,513 करोड़ का भुगतान किया जा चुका है. वहीं, बीमाकर्ताओं द्वारा प्रीमियम और रुपये के दावों के लिए 9,737 करोड़ रुपये एकत्र किए गए हैं. 31 मार्च तक पीएमजेजेबीवाई के तहत 14,144 करोड़ का भुगतान किया जा चुका है.