Friday, February 26, 2021

आर्थिक नियोजन कसे कराल...: श्री. संदीप कुलकर्णी, CA


 
आर्थिक नियोजन कसे कराल...???


१)  आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीजास्त 30% च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे.


2)  साधारण 30% रक्कम ही बँक सेव्हींग, कर्ज, देणी  इत्यादीसाठी आणि   


3) साधारण  30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी गुंतवणुक केली पाहिजे.


४) आणि उरलेले फक्त १०% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी.


५) कमीतकमी पुढील ६ महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, 

किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर ६ महिने पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले खर्च चालतील.


६) सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही. सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च , 

आणि वाढती महागाई वगळून जास्तीजास्त ५% फायदा करून देऊ शकते.


७) ४५ वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर असू नयेत.मुलांचे उच्च शिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचे प्लॅनिंग  आपल्या 30 व्या वयापासूनच व्हायला हवेत.


८) बँकेत पती-पत्नीचे Joint Account असणे अनिवार्य आहे.


९) आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे हवी, कारण As per legal act पती च्या मृत्यू नंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले.


१०) प्रत्येकाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. टर्म इन्शुरन्स असणे ही गरजेचे आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार व संरक्षण देते.


११) कुठलेही इन्व्हेस्टमेंट चे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये. माझ्या मुला/मुलीच्या नावाने विमापॉलीसी, बँक फिक्स डिपॉझीट, पोष्ट गुंतवणुक अशी गुंतवणुक नको, कायम आपल्या नावावर विमा/ गुंतवणुक असावी.


१२) मेडिक्लेम हा अत्यंत गरजेचा आहे.


१३) जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त 1 लाख पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते.उरलेले नुकसान आपले असते.


१४) तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून आयकर कमी करू शकतात. तुमचे उत्पन्न जास्त असो वा कमी असो, 

टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे लोन, हेच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते.


१५) सर्व फायनॅन्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा, जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फेमिली मेंबर्स ते योग्यप्रकारे वापरु शकतील.


१६) आपला प्रोग्रेस ग्राफ दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफप्रमाणे आपली इन्व्हेस्टमेंट, व्यवसाय निर्णय बदलता येतात.


वाचा, विचार करा व पुन्हा वाचा  व आता निर्णय घ्या.

दिवसा मागून दिवस,वर्षा मागून वर्ष निर्णयाशिवाय कसे निघून जातात हे कळत नाही... .

आजच वरील १६ मुद्द्यांवर आधारीत उज्ज्वल व सुरक्षित भविष्यासाठी योग्य नियोजन करा...!

- साभार 

श्री. संदीप कुलकर्णी, CA

Friday, February 19, 2021

Lessons about Donation : From Article 'Red Rice Granary' : Mrs. Sudha Murthy, Chairperson, Infosys Foundation.

 




Lessons about Donation : From Article 'Red Rice Granary' 

This article "The Red Rice Granary" is written by  Mrs. Sudha Murthy, Chairperson, Infosys Foundation.

The author's  grand parents used to donate 'white rice', the best quality of rice they had to the needy and poor people while they used to eat the 'red rice' at home. This taught the author, things about donation ! 

The lessons author has learned and narrated for us are:

"Donate with kind words.


Donate with happiness.


Donate with sincerity.


Donate only to the needy.


Donate without expectation because it is not a gift. it is not a gift. It is a duty.

Donate with your wife's consent.

Donate to other people without putting your dependents in a a helpless state.

Donate without caring for caste, creed and religion.

Donate with an intention so that the receiver should prosper.'''


Let us try to adopt this in our lives ! Thanks to Mrs. Sudha Murthy, who has enlightened us with her learnings  and example !! 

 

Friday, February 12, 2021

मनो-Money: भाग २५ : चेक लिहितानांचा चेक ! -डॉ. रुपाली कुलकर्णी

 

चेक लिहितानांचा चेक !

 


राधा बाबांकडे येतांना, तिच्या बँक अकाउन्टचे चेक-बुक हातात घेऊन येते.

राधा: बाबा, हे माझ्या बँक अकाउन्टचे चेक-बुक ! तुम्ही म्हणाला होतात ना, की यावेळी माझ्या शाळेतील  व्हॅनच्या भरत काकांना तू चेकने पैसे दे... तर मी हे घेऊन आले आहे. यातील "Pay" च्या ठिकाणी भरत-काकांचे नाव आणि "Date" च्या ठिकाणी तारीख लिहिता येईल मला. अंकी आणि अक्षरी रक्कमही समजते आहे  मग आता लिहू का मी हा चेक ?

बाबा: वा राधा ! तुझ्या लक्षात होते तर. आणि  चेक लिहायला आपल्याला जमायला हवे, असे तुला वाटले त्याबद्दल  तुझे कौतुक ! सांगतो, नीट बघ. चेक वर "Pay" हे फिल्ड आहे. त्याच्यापुढे आपल्याला कोणाला हे पेमेंट करावयाचे आहे म्हणजे व्यक्ती किंवा कंपनी, त्याचे नाव लिहितात. शिवाय चेकच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दोन आडव्या रेघा मार.  म्हणजेच 'Crossed' चेकचा वापर कर. असे केल्याने  तो चेक फक्त भरत काकांच्याच खात्यात भरला जाईल याची खात्री होइल. उद्या  भरत-काकांना विचारून नावाची एकदा  खात्री करून घे.

राधा: बाबा,  भरत काकांच्या नावे लिहिलेला चेक त्यांच्याच खात्यात भरला जाईल ना ! मग हे Crossed चेक प्रकरण कशासाठी?

बाबा:अग समजा, तू दिलेला आणि क्रॉस न केलेला चेक जर काकांकडून हरवला आणि इतर कोणा लबाड व्यक्तीला तो सापडला तर अशी व्यक्ती बँकेच्या काउंटरवरूनच,  भरत काकांचे नाव सांगून, रोख रक्कम मिळवू शकते. म्हणून , योग्य व्यक्तीच्या खात्यातच चेक जमा व्हावा म्हणून ही 'Crossed'  चेकची पद्धत.  शिवाय तुझ्या बँक अकाउन्टमध्ये पुरेशी रक्कम आहे ना याचीही खात्री आज करून घे.

राधा: हो बाबा. माझ्या बँकेच्या अकाउन्टसाठी  आईचा  मोबाईल नम्बर रजिस्टर आहे. तेव्हा आईच्या मोबाईलवरून कॉल करून, तिकडे आता ३००० रु. जमा आहे हे मी माहीत करून घेतलेय .  आणि  मला  तर १००० रु. चा चेक लिहायचाय.

बाबा: शाब्बास राधा !    कोणालाही आपल्या  अकाउन्टमधून चेकने पेमेंट करण्याआधी, अकाउन्टमध्ये पुरेशी रक्कम आहे ह्याची खातरजमा करून घ्यायला हवी. अकाउन्टमध्ये  पुरेशी रक्कम नसताना, जास्तीच्या रक्कमेचा चेक जर कोणी दिला आणि घेणाऱ्याने तो आपल्या अकाउन्टमध्ये  जमा केला, तर तो चेक प्रोसेस होऊ शकणार नाही म्हणजेच "चेक बाऊन्स" होईल. आणि असे होणे हा दंडनीय अपराध आहे बरं  का ! अशावेळी चेक घेणारा आणि देणारा याना बँक आर्थिक दंड तर करतेच शिवाय चेक  घेणाऱ्याने जर तक्रार केली तर चेक देणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊंन अशा फसवणूकीसाठी त्याला दोन वर्षे इतका  तुरुंगवासही होऊ शकतो.

राधा: ओह, बापरे ! हे तर मला नव्हते माहीत बाबा. बरे झाले मी माझ्या बँक अकाउन्टचा बॅलन्स आधीच चेक करून ठेवला होता. पण बाबा, तुम्ही सांगितली ती  झाली चेक-बाऊन्सची बाब. पण  समजा मी जर चुकून जास्तीच्या  पेमेंटचा आकडा चेकवर लिहिला आणि तो चेक कोणाला देऊन टाकला तर?    

बाबा: राधा, असे करणे म्हणजेही चेक देणाऱ्याची चूकच झाली ना ! अशावेळी तुम्ही तुमच्या बँकेला माहिती देऊन , तो चेक प्रोसेस न करणेबाबत सांगू  शकता. याला म्हणतात  "Stop  Payment" केस.  पण झालेल्या चुकीबद्दल, तुम्हाला बँक आर्थिक दंड करू शकते.  ही "Stop  Payment" सुविधा, चेक देणारा व्यक्ती आर्थिक फसवणूक, झालेला करार संपणे, चेक गहाळ होणे  अशा वेळेही वापरू शकतो.

राधा: बाबा , चेक लिहिताना तर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यायला हवी मग ! तुम्ही सांगलीतलेला 'चेक लिहीतानांचा चेक' मी आता  लक्षात ठेवीन.

बाबा: Ok ! पळा आता, मलाही ऑफिसलाही निघायचेय.

राधा आणि बाबा आपापल्या कामास जातात. 

डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड, SWS


Friday, February 5, 2021

रिटायरमेंट प्लॅनिंगकडे वेळीच लक्ष द्या ! : श्री. राजेश देशपांडे, अहमदनगर.

 रिटायरमेंट प्लॅनिंगकडे वेळीच लक्ष द्या !    

- श्री. राजेश देशपांडे,  अहमदनगर. (साभार : महाराष्ट्र टाइम्स: अर्थवृत्त)



एच.एस.बी.सी.या नामांकित संस्थेने केलेल्या आर्थिक सर्व्हेनुसार निवृत्तीवेतन म्हणजेच मासिक पेन्शन मिळणार नसतांनाही ७६ टक्के तरुण अथवा प्रौढांना सध्या चालू आहे तशीच जीवनशैली निवृत्तीनंतर जगावयाची आहे. ४५ टक्के कमावत्या भारतीयांची मानसिकता "कल किसने देखा है" या प्रकारात मोडणारी आहे. नोकरी, व्यवसाय माध्यमातून वाढणार्या मिळकतीचा बराचसा मोठा हिस्सा आपल्या बदलणार्या जीवनशैलीवर अनेकजण खर्च करू लागले आहेत. मागील पिढीला ज्या वस्तू चैन करण्याच्या वाटायच्या त्याच वस्तू नविन पिढीला चमकत्या मॉल संस्कृतीमध्ये जीवनावश्यक वाटू लागल्या आहेत. ऑक्सफर्ड अकॅडेमी जर्नल ऑफ कन्झ्युमर डेटा नुसार अनेक बहुराष्ट्रीय तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादन व विक्री करणार्या कंपन्यांचा " कन्झ्युमर बिहेवियरचा" अभ्यास आणि त्याचा उपयोग फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा यासारख्या विकसित देशात झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करून नफा वाढविण्याची वेळ आणि जागा आता क्रयशक्ती वाढत चाललेल्या भारतामध्ये आहे. मागील आर्थिक इतिहासाची पाने चाळल्यास लोकांना उत्पन्नापेक्षा जास्त प्रमाणात खर्च करायची चंगळवादी सवय अनेक पाश्चात्य अर्थव्यवस्थांनी लावून ठेवली आहे. रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत ब्रँडचे महत्व तसेच तथाकथित राहणीमानाचा सामाजिक दर्जा उदा. मोबाईलचा ब्रँड किंवा बुटाचा महागडा ब्रँड वापरण्याची सवय यासाठी तत्काळ उपलब्ध होणारे कर्ज ज्या प्रमाणे अमेरिकेमध्ये क्रेडिटकार्ड या गोंडस नावाने सुरु झाले त्याचप्रमाणे आता भारतातही जसा जसा डिजिटल शिक्षणाचा टक्का वाढू लागला तसा तसात त्याचा वापरही वाढू लागला आहे. मागील पिढीच्या सेव्हिंग इकॉनॉमिकडून आपला प्रवास आता दरडोई उत्पन्न वाढू लागल्याने स्पेंडिंग इकोनॉमिकडे सुरु झाला आहे. एका बाजूला वाढत्या अर्थव्यवस्थेला ते मजबूती देणारे आहे. १३५ कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात ज्येष्ठ नागरिक आणि अल्पवयीन मुले वगळता जवळजवळ ९५ कोटी नागरिक या - ना त्या मार्गाने जीवनक्रम चालविण्यासाठी पैसा कमावित आहेत. त्यांचा तो पैसा जीवनावश्यक गोष्टींवर ते खर्च करीत आहेत 'एकदाच घ्यायचे पण ते टिकाऊ घ्यायचे'  ही मानसिकता बदलून 'युज अँड थ्रो' "च्या जगात आता अल्प उत्पन्न असणारेही सहजतेने वावरू लागले आहेत. " अंथरूण पाहून हातपाय पसरावेत" या अर्थाच्या म्हणी आता फक्त पुस्तकातच राहिल्याची परिस्थिती हळू हळू दिसत आहे.

. भारतीय बाजारपेठेत शिरण्यासाठी मोठी किंमत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या मोजित आहेत हे आपण कोरोना सारख्या संकटकाळातही ॲमेझॉन, फेसबुक या सारख्या कंपन्यांनी भारतात केलेल्या गुंतवणुकांवरून पहातच आहोत. अशावेळी पैसा मिळत असतांना त्याचे योग्य नियोजन करण्याइतपत स्वतःचे आर्थिक ज्ञान वाढवणे व त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तरूण वयात मिळणारा पैसा खर्च करतांना अत्यावश्यक, आवश्यक आणि तरतूद केल्यानंतरच अशी क्रमवारी कमावत्या व्यक्तीने करणे गरजेचे आहे. चित्रपट क्षेत्रातील नामवंत ए.के. हंगल, भगवानदादा अशा एक ना अनेक जणांचे जीवनातील उत्तरार्ध आर्थिक हालाखित गेले ते रिटायरमेंट प्लॅनिंग नसल्यानेच. आजही अनेक व्यापारी, लघुउद्योजक, डॉक्टर्स सध्याच्या वेगवान जगात घर, बंगला किंवा व्यावसायिक विस्तारासाठी कर्जे वाढवतांना स्वतःच्या सेवानिवृत्तीच्या कॉर्पस् ला दुय्यम स्थान देतात. चक्रवाढदर म्हणजेच कंपाऊंडिंग हे जगातील आठवे आश्चर्य आहे. मात्र त्याचा फायदा मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. ज्याला तो समजतो तो " पैशाने पैसा कमावतो.... ज्याला तो समजत नाही तो पैसा गमावतो... " असे महान शास्त्रज्ञ अलबर्ट आईनस्टाईन यांनी म्हटले आहे. सामान्यतः पगारच पुरत नाही तर निवृत्तीकडे कोण पहाणार ? अजून मुले लहान आहेत, त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचेच काय करायचे ? असे एक ना अनेक प्रश्न रिटायरमेंट प्लॅनिंग करतांना असू शकतात. मात्र - "इच्छा आहे तेथे मार्ग आहे".

        सन 200४ नंतर सरकारी पेन्शन तर बंदच झाली आहे, त्यामुळे फक्त खाजगी क्षेत्रातीलच नव्हे तर सरकारी नोकरांनीसुध्दा - (उत्पन्न वजा खर्च) = बचत, या ऐवजी (उत्पन्न वजा बचत)= खर्च , हा मंत्र अंगिकारणे जरूरीचे आहे. नोकरीच लागल्यानंतर सुरुवातीस कमी रकमेपासुन जरी गुंतवणुकीस सुरुवात केली तरी जसजसे उत्पन्न वाढू लागते त्याप्रमाणात त्यातील काही हिस्सा हा फक्त सेवानिवृत्ती साठीच असे नियोजन करून घेणे महत्वाचे ठरते. वैद्यकीय तंत्रज्ञान व औषध क्षेत्रातील वाढणार्या संशोधनामुळे संपुर्ण जगातच मानवांचे आयुष्यमान वाढत आहे. भारतात पूर्वीच्या काळातील 60 वर्षांलरील प्रौढ व्यक्तींची सरासरी आयुर्मर्यादा वाढू लागली आहे. परंतू दुसर्या बाजुला बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, कामाचा अतिरिक्त ताणतणाव या सारख्या गोष्टींमुळे वृध्दावस्था निरोगी असेलच याची खात्री कोणालाच देता येत नाही. त्यामुळे वास्तव आयुष्य गरजांची पूर्तता करण्यासाठी जितकी महत्वाची ई.एम.आय. ठरते तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्व नियमित गुंतवणुकीस देण्यासाठी स्वतःमध्ये मानसिक बदल घडवणे प्रत्येकासाठी महत्वाचा ठरतो. "Don't put all eggs in one basket'' या प्रमाणेच रिटायरमेंट प्लॅनिंग करतांनाही एन.पी.एस., पी.पी.एफ. याचप्रमाणे भारतीय गुंतवणुकदारांनी पुढील २०-२५ वर्षांनी लागणार्या पेन्शन फंडासाठी भारतीय शेअर बाजारातील चांगल्या ब्लुचिप कंपन्या गुंतवणुक करणाऱ्या रिटायरमेंट फंडात दीर्घावधीचे योग्य नियोजन करून नियमित गुंतवणुक केल्यास फक्त उपभोक्ता म्हणुन खर्च करण्यापेक्षा गुंतवणुकदार म्हणून ब्लुचिप कंपन्यांच्या श्रीमंतीमध्ये आपलीही भागीदारी आपल्याला महागाई दरापेक्षा जास्त दराने परतावा देऊ शकेल. रिटायरमेंट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. मुलांचे शिक्षण कौटुंबिक जबाबदार्या, नोकरी व्यवसायातील धावपळ हे सर्व करीत असतांना स्वतःची वैयक्तिक आवड, मग ती पर्यटन असो, बागकाम असो वा संगीत असो याकडे लक्ष देणे अनेकांना जमत नाही.

स्वतःचा व्यापार करणारे व्यावसायिक किंवा स्वतःचा छोटा कारखाना असणारे लघुउद्योजक आपल्या व्यवसायाचे रूपांतर आयुष्यभर कष्ट करून करोडो रुपयांच्या संपत्तीत करतात व तो व्यापार किंवा संस्था पुढील पिढीच्या हवाली करतात अशा वेळी ती संपत्ती बॅलन्सशीटमध्ये वाढण्याबरोबरच योग्यवेळी योग्य नियोजन करून स्वतःच्या रिटायरमेंटचा एक वेगळा कप्पा करणे ही काळाची गरज आहे. वयाच्या तिशीपासुनच योग्य आहार, व्यायाम व गुंतवणुकीतील सातत्य तुमची सेवानिवृत्तीची आनंदयात्रा ठरेल, अन्यथा "संध्या छाया भिववती हृदया" हे ठरलेलेच आहे.


-   श्री. राजेश देशपांडे,  अहमदनगर. (साभार : महाराष्ट्र टाइम्स: अर्थवृत्त)