Friday, June 10, 2022

गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

 



गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

गुंतवणूक हा आर्थिक नियोजनाचा महत्वाचा भाग आहे. परंतु, दुर्दैवाने फार कमी लोकांना गुंतवणुकीचे महत्व कळते. आजच्या लेखात आपण गुंतवणुकीची प्रमुख कारणे कोणती आहेत, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 


आपण या लेखात गुंतवणुकीची प्रमुख कारणे पाहणार आहोत. 

१. आपली आर्थिक उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी:

  • आपण ठरवलेली आर्थिक उद्दीष्ट्येच  गुंतवणुकीची प्रेरणा देत असतात. मग ती उद्दिष्टये स्वतःच घर विकत घेण्याचं असो,मुलांच्या उच्च शिक्षणाचं असो,आलिशान गाडी घ्यायचं असो किंवा सेवानिवृत्ती नंतर आरामदायी क्षणांचं असो.
  • आपल्या आर्थिक उद्दिष्टांची यादी करा आणि  ही उद्दिष्टये साध्य करण्यासाठी त्यानुसार आवश्यक जमापुंजी बाळगणे आवश्यक आहे. म्हणूनच गुंतवणूक करताना अल्प-मुदत किंवा दीर्घ-मुदतीचे पर्याय निवडून योग्य परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा प्रारंभ करावा. 

२. कर वाचवण्यासाठी 

  • कर वाचविण्यासाठी १९६१ च्या आयकरकायद्याच्या कलम ८० सी नुसार पगारधारकांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 
  • आपलं करपात्र उत्त्पन्न कमी व्हावे म्हणून वेगवेगळे गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करायला हवा. 
  • वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकता. 

३. दीर्घकाळासाठी आर्थिक संपत्ती तयार करणे:

  • संपत्ती निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी गुंतवणूकीची योजना तयार करणे पूर्णपणे आवश्यक आहे.
  • दीर्घकाळासाठी संपत्ती तयार करण्याच्या हेतूने गुंतवणुकीचा विचार करताना आकर्षक परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी अशा पर्यायांचा विचार करावा.

४. सेवानिवृत्तीची सोय म्हणून:

  • आजची पिढी चांगली म्हणजे पाश्चात्य  जीवनशैलीच्या आहारी जाऊन सगळ्या गोष्टींसाठी खर्च करत असते. 
  • निवृत्तीनंतर निवांत आणि चिंतामुक्त आयुष्य घालवायचे असेल, तर हाताशी पुरेशी गुंतवणूक असायला हवी. 
  • कुठलीही वेळ सांगून येत नसते म्हणून अचानक येणारं आजारपण तसेच इतर काही पारिवारिक बऱ्याचदा ही उंचावलेली जीवनशैली राखण्यासाठी निवृत्तीनंतरच्या नियोजनाचा विसर पडतो. पण जर अडचणींवर मात करण्यासाठी योग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 


५. भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास:

  • व्यवसाय सुरु करायचं म्हटलं की पुरेसं भांडवल असणं आवश्यक आहे. 
  • आर्थिक गुंतवणूक ही व्यवसाय निर्मिती आणि वाढीचा महत्वाचा भाग आहे. 
  • भांडवल निर्मितीच्या उद्देश्याने गुंतवणूक करण्यासाठी जोरदार परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करायला हवा.
  • अनेक मोठे गुंतवणूकदार व्यवसाय वाढीसाठी किंवा नवीन स्टार्टअपसाठी वित्त पुरवठा करतात. ते नवीन व्यावसायिकांना उद्योग स्थापन करण्यासाठी हातभार लावतात. पण असे गुंतवणूकदार शोधणे सोपं नाही, म्हणून वैयक्तिक गुंतवणूक असणे आवश्यक आहे.  
  • व्यवसाय सुरु करणे व वाढविणे ही फारशी सोपी गोष्ट नव्हे म्हणून आपली प्रारंभिक आर्थिक योजना तयार असणे आवश्यक आहे तरच तुम्ही यशस्वी उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करू शकाल.      


 ६. आपली जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी:

  • असं म्हणतात कोणतीही वेळ सांगून येत नसते. अर्थात उद्या काय होईल याचा तर्क आपण कोणीही काढू  शकत नाही. 
  • प्रत्येकाचे आयुष्य अनिश्चित प्रसंगांनी भरलेलं असते. कधी एखादी दुर्दैवी घटना घडू शकते ज्यामुळे तुम्हाला अचानक अनेक आर्थिक संकटाना तोंड देणं भाग पडू शकतं.  
  • अशा आर्थिक बदलांना सामोरे जाण्यासाठी उशाशी थोडा पैसे बाळगून असणं केव्हाही चांगलंच.
  • आपल्या गुंतवणुकीच्या काही भागाची गुंतवणूक आपण कधीही तात्काळ काढू शकतो अशा पर्यायांमध्ये करावी ज्याला ‘तरल गुंतवणुक’ असं म्हणतात. 
  • यामुळे काही भीषण परिस्थितीत नोकरी करणे शक्य नसले तरी या गुंतवणुकीची मदत घेऊन तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवू शकता तसेच रोजची जीवनपद्धती देखील विस्कळीत होणार नाही.

७. वायफळ खर्च कमी करण्यासाठी:

  • तुमच्याकडे किती नवनवीन कपडे किंवा किती लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आहेत यामुळे तुमच्या भविष्यावर फारसा फरक पडत नाही. मात्र तुम्ही किती गुंतवणूक केली आहे याचा संबंध तुमच्या भविष्याशी येतो. म्हणूनच योग्य वयात आपल्या काही वायफळ सवयींवर नियंत्रण ठेऊन अनावश्यक खर्च कमी करायला हवे. 
  • बचत खात्यात पैसे गुंतवणे, स्टॉक मार्केट, बँकेची मुदत ठेव योजना (एफडी), बॉण्ड्स अशा काही पर्यायांचा विचार करून गुंतवणुकीची सुरुवात करायला हवी. यामुळे ठराविक आर्थिक शिस्त राखली जाईल . 
  • गुंतवणूक ही एखाद्या झाडाप्रमाणे आहे, आज ते झाड लावलं, नियमित लक्ष दिलं तरच त्याची फळे उद्या खायला मिळतील. त्याप्रमाणे आज योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा भविष्यात दिसेल. 


८. भविष्याचं आर्थिक नियोजन आणि आर्थिक सुरक्षितता 

  • भविष्याच्या दृष्टीने वित्त व्यवस्थापनाचा विचार करत असाल तर मासिक खर्चाच सुद्धा योग्य नियोजन व आर्थिक शिस्त हवी. गुंतवणुकीची सुरुवात लवकर केल्यास आपली आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी आपण अधिक सक्षम होऊ शकतो. 
  • अतिरिक्त पैसा जवळ असणे हे गुंतवणुकीचे मुख्य धोरण आहे.भविष्यात येणाऱ्या अचानक अडचणी उदाहरणार्थ, घरात कुणाचं एखादं मोठं आजारपण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अशा अनेक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणे आवश्यक आहे. 
  • आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे संतुलन राखणे आवश्यक आहे. 

थोडक्यात,गुंतवणुकीमुळे आपल्या पैश्याची वाढ होण्यास मदत होते,आपली आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करता येतात. तसेच भविष्यातील आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी योग्य जमापुंजी तयार करता येते. त्यामुळे योग्य आर्थिक नियोजन करून गुंतवणुकीस प्रारंभ करा व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याचा आनंद घ्या.  


-- साभार : अर्थसाक्षर

Friday, June 3, 2022

PMJJBY और PMSBY के प्रिमीयम मे बढोती

 


केंद्र सरकार ने साल 2014 में प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना और प्रधानमंत्री  सुरक्षा बीमा योजना की शुरुआत की थी. इस योजना के जरिए सरकार गरीबों और जरूरतमंदों तक बीमा की सुविधा पहुंचाने का काम कर रही है.  1 जून 2022 से आपको इसके लिए ज्यादा पैसे खर्च करने होंगे. 


प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा क्या है? (PMJJBY)  

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना के तहत आपको 2 लाख रुपये का इंश्योरेंस कवर की सुविधा मिलती है. इस योजना का लाभ लेने के लिए आपकी उम्र 18 से 50 साल के बीच होनी चाहिए. इस योजना की प्रीमियम की राशि ऑटो-डेबिट (Auto Debit Mode) के जरिए कट जाती है. आपके अकाउंट में केवाईसी (KYC) की सुविधा होनी चाहिए. 

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना क्या है? (PMSBY)

यह एक साल की दुर्घटना बीमा योजना है. इसका भी साल-दर-साल नवीनीकरण किया जाता है और दुर्घटना के कारण मृत्यु या विकलांगता के लिए कवरेज की पेशकश की जाती है. बैंक या डाकघर में बचत खाता रखने वाले 18-70 वर्ष के आयु वर्ग के व्यक्ति इस योजना के तहत नामांकन के लिए पात्र हैं. दुर्घटना के कारण मृत्यु या विकलांगता के लिए 2 लाख रुपये (आंशिक विकलांगता के मामले में 1 लाख रुपये) दिए जाने का प्रावधान है.

केंद्र सरकार ने दोनों योजनाओं के प्रीमियम में बढ़ोतरी करने का फैसला लिया है. प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) का सालाना प्रीमियम 330 रुपये से बढ़कर अब 436 रुपये हो गया है. इसके अलावा सरकार ने प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) के प्रीमियम को 12 रुपये से बढ़ाकर 20 रुपये करने का फैसला लिया है. बता दें पहले यह प्रीमियम 12 रुपये सालाना था. इसमें 8 रुपये का इजाफा किया गया है. 

31 मार्च तक PMJJBY और PMSBY के तहत सक्रिय ग्राहकों की संख्या क्रमशः 6.4 करोड़ और 22 करोड़ थी. PMSBY योजना में बीमाकर्ताओं द्वारा 1,134 करोड़ रुपये की राशि प्रीमियम और रुपये के दावों के लिए एकत्र की गई हैं. 31 मार्च तक सुरक्षा बीमा योजना के तहत 2,513 करोड़ का भुगतान किया जा चुका है. वहीं, बीमाकर्ताओं द्वारा प्रीमियम और रुपये के दावों के लिए 9,737 करोड़ रुपये एकत्र किए गए हैं. 31 मार्च तक पीएमजेजेबीवाई के तहत 14,144 करोड़ का भुगतान किया जा चुका है.


Friday, March 4, 2022

लढाई सायबर क्राईम रोखण्यासाठी # १




 बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे  पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’   हा नंबर करा डायल

काही मिनिटांत आपली  रक्कम होल्डवर जाईल !!

सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे  कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा 

कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.


यंत्रणा काम कशी करते?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.

एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्सu संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या खुप  संस्था जुळलेल्या आहेत.

Friday, February 4, 2022

Crypto Update @ Union Budget 2022


India’s crypto industry rejoiced when finance minister Nirmala Sitharaman announced tax rules for virtual currencies in her budget speech on Tuesday. But they quickly learned that recognition doesn’t equal legitimacy, which only the long-awaited cryptocurrency bill could bring.

"Taxing does not automatically bring legitimacy," the finance minister said during a media interaction after her budget speech.

Here’s  crisp about crypto:

o   A 30% tax on income from crypto assets.

o   Losses can not be set off against any other income.

o   1% TDS on all crypto transactions above a certain threshold.

o   Gift taxes, if any, will be the liability of the recipient.

o   RBI-backed ‘digital rupee’ to be launched in FY23.

That said, this was the first time the budget explicitly defined “virtual digital assets”. Non fungible tokens (NFTs), which we have written about extensively, also got a mention. The industry has come a long way from just a few years ago when it was facing down a proposal to imprison anyone holding cryptocurrency for up to 10 years.

        The government has defined “virtual digital asset” to mean any information, code, number or token, generated through cryptographic means or otherwise, that provides a digital representation of value, or functions as a store of value or a unit of account, and can be transferred, stored or traded electronically.

What’s still unclear: Here’s what we still don’t know, among other things.

o Whether gains from one crypto can be offset against losses from another.

o Rules around transferring crypto to exchanges or private wallets registered in another country.

o   Whether traders can hold crypto as stock in trade.

o   How crypto-to-crypto trades will be treated.

 

 


Friday, January 21, 2022

घोटाळे आणि आर्थिक साक्षरता


'फटे स्कॅम' , 'तीस-तीस' घोटाळा  ह्या चालू घडामोडी भारतामध्ये आर्थिक साक्षरता किती  कमी आहे, याचे द्योतक आहेत  

मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम'ची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु होती. आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून तो मागील काही दिवासांपासून फरार होता. फटेने बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींची फसवणूक केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 75 हून अधिकजणांची विशालने 18 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

फटे स्कॅम चर्चेत असताना औरंगाबादसह मराठवाड्यात 'तीस-तीस स्कॅम'ची चर्चा जोरात आहे.'तीस-तीस' घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला होता. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा नंतर फिर्यादीनं मागे घेतला.


'तीस-तीस' घोटाळा काय आहे ?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम या तरुणाने केलं.

 काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 10 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.  त्यामुळं हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होतेय.  

 हे सर्व प्रकार बघता भारतामध्ये  "आर्थिक साक्षरता" या क्षेत्रात कार्य करण्याची किती गरज आहे हे लक्षात येते.    

Friday, January 14, 2022

आधार कार्डमध्ये डेमोग्राफिक अपडेट

 


आधार कार्ड, भारतातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे, सध्याच्या काळात आपल्या सर्वांसाठी (Aadhar Card Updates) खूप महत्त्वाचे आहे. आधार कार्ड (Aadhaar card) नसल्यास आपली अनेक महत्त्वाची कामे थांबू शकतात. आधार कार्डाशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. भारतात (India) आधार कार्ड केवळ प्रौढ आणि वृद्धांसाठीच नाही तर लहान मुलांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. मुलांच्या शाळा प्रवेशासाठी आणि अनेक प्रकारच्या सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. गरज भासल्यास आधार कार्डमध्येही बदल करता येतील. देशात आधार कार्ड जारी करणाऱ्या UIDAI ने वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहेत.

UIDAI नुसार, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतीही डेमोग्राफिक अपडेट करायची असेल, तर त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जातात. याशिवायच बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आहे. तर, मुलांसाठी आवश्यक असलेली आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत आहेत. मात्र, लोकांकडून ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचे अनेकवेळा दिसून येते. UIDAI विहित मर्यादेपेक्षा जास्त शुल्क आकारण्याच्या विरोधात आहे.


Friday, January 7, 2022

आर्थिक साक्षरता महत्त्वाची

 



आपण आर्थिक साक्षर होणे म्हणजे अगदी सोप्या शब्दात "आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आणि कुवतीनुसार जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवणे' होय. येणाऱ्या काळात आर्थिक साक्षरता ही सर्वांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट होणार आहे.

 आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालणे आणि चांगला परतावा मिळवणे हे आर्थिक साक्षरतेचे निकष म्हणता येतील. आपल्याला वाटते तेवढे ते अवघड नाही. अत्यंत सोपे ठोकताळे वापरून आपण ते बऱ्याच अंशी साध्य करू शकतो.

 "आपल्याला त्या आकडेमोडीतील काही कळत नाही बुवा!' किंवा "माझ्या इन्शुरन्सच्या पॉलिसीचं आमचा एजंटच बघतो, मला वेळच नसतो' ही किंवा अशा अर्थाची वाक्ये आपण आजूबाजूला ऐकत असतो. आपल्या स्वतःच्या आर्थिक व्यवहाराचे निर्णय अनेक जण अशा प्रकारे इतरांवर सोपवतात. काही अपवाद वगळता यापैकी अनेकांना आपल्या पैशांची गुंतवणूक नक्की कशा प्रकारे होत आहे, याची पुसटशी कल्पनादेखील नसते. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक साक्षरतेचा अभाव! एका बाजूला आपली आर्थिक सुबत्ता तर वाढवायची आहे; परंतु दुसरीकडे त्यासाठी लागणारे अगदी मूलभूत ज्ञान घ्यायचे नाही, अशा कात्रीत सापडल्याने अनेक जण आर्थिक आघाडीवर चुकीचे निर्णय घेताना दिसतात.

 आपल्या आजूबाजूला ज्या झपाट्याने बदल होत आहेत ते तर आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ, वाढती महागाई, वस्तूंची टंचाई, दवाखान्याचे वाढते खर्च, नोकरीतील अस्थिरता आदी. अगदी सोप्या उदाहरणाने आपण हे समजून घेऊ शकतो. ज्या व्यक्तीचे आजचे वय ३५ वर्षे आहे आणि ज्याचा सध्याचा दरमहा घरखर्च अंदाजे पंधरा हजार रुपये आहे, अशा व्यक्तीला त्याच्या निवृत्तीच्या वेळी म्हणजेच साधारणतः त्याच्या साठाव्या वर्षी त्याच घरखर्चासाठी अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपये लागतील. या ठिकाणी महागाईचा दर आठ टक्के प्रतिवर्ष एवढा राहील, असे मानले आहे. प्रत्यक्षातील महागाई यापेक्षा खूप जास्त आहे, हे आपल्याला माहीतच आहे. यावरून वैयक्तिक आर्थिक साक्षरतेची गरज आपल्याला कळू शकेल.